असं का करायचं?? (भाग ३)

Posted by मधुरा on 12:03 AM

          मुलगा असो की मुलगी.. गळ्यात साखळी घालताना तरी आपण स्त्री-पुरुष हा भेदभाव करत नाही... सगळेच गळ्यात साखळी घालतात.. पण ती का घालायची?? असा प्रश्न पडला असेल ना....  

          गळ्यात एकसर का घालायची??
          गळ्यातल्या एकसरीचा गळ्याच्या दोन्ही बाजूला खांद्याशी जिथे स्पर्श होतो हे बिंदू आहेत प्रेमाचे.. वात्सल्याचे.. मायेचे..
           प्रेम, वात्सल्य यामुळेच तर आपल्या आयुष्यात आनंद आहे! जिथे प्रेम नाही तिथे जीवनात काय आनंद राहिला?
           तसंच एकसरीचा गळ्याशी आलेल्या मण्यामुळे सर्दी, कफ यामुळे येणाऱ्या दम्यावर नियंत्रण रहातं!


          दुसरा प्रश्न असा की नाकात नथ का घालायची?
          आजकाल लग्न किंव्वा मोठ्या कार्यक्रमातच आपण नथ घालतो.. आणि एरवी एक छोटासा सोन्याचा मणी.. पण त्याचा काही उपयोग नाही! आधी जशी मोठी नथ घालायचे त्यामुळे दात दुखणे.. हिरड्या सुजणे.. तसंच उन लागून नाकातून रक्त येणे असे त्रास होत नाहीत..

(पण नथ हा अलंकार पुरुषांसाठी नाही... त्यांना या त्रासातून वाचण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे!! :D )