रावणाचा वध करू शकेल असा रामाशिवाय त्यावेळी कोणीही राजा नव्हता?
श्रीरामांनी युद्ध करून रावणाचा वध केला आणि सीतेला मुक्त केले हे सर्वांना माहिती आहे. पण त्या वेळी या पृथ्वीवर एकही असा वीर नव्हता का की जो रावणाचा वध करू शकेल? श्रीरामांना सुद्धा हा प्रश्न पडला. रावणाचा वध करून अयोध्येला आल्यावर सर्वांचे अभिनंदन स्वीकारताना श्रीराम ऋषींना विचारतात, "ऋषीवर्य, रावणाचा पराभव करू शकेल असा त्यावेळी एकही राजा नव्हता का?" हृषी रामाला सांगतात, "राम, रावणाचा पराभव करणारे एकाच नाही तर तीन राजे होऊन गेले! एक, दैत्य कुळात जन्माला आलेला आणि वामनाने पाताळात पाठवलेला बलीराजा. दुसरा क्षत्रिय कुळात जन्माला आलेला सहस्त्रार्जुन. आणि तिसरा वानर कुळात जन्मलेला वाली राजा.
या तिघांनीही रावणाचा पराभव केलेला होता. पण घडले असे की, बली कडून रावण पराजित झाला तेव्हा रावणाचा पिता विश्रवामुनी अतिथी म्हणून बळीच्या दाराशी गेला आणि याचना करून भिक्षारुपाने रावणाची त्याने मुक्तता करून घेतली. सहस्त्रार्जुनाकडून सुद्धा तशीच मुक्तता करून घेतली. रावणाला जिंकणारा तिसरा वीरपुरुष वानर राजा वाली सोबत रावणाने वेगळी पावले टाकली.
त्यावेळी वानर राष्ट्र आणि राक्षस राष्ट्र ही दोन्ही बलाढ्य राष्ट्रे होती. पहिले रावणाने स्वतःच वालीवर आक्रमण केले. वालीने त्या आक्रमणात रावणाला हरविले. आपण हरलो हे लक्षात येताच रावणाने वालीसोबत अग्निसाक्ष 'सख्य' करून मैत्रीचे नाते जोडले. या मैत्रीच्या तहात रावणाने मोठ्या हुशारीने वानर राष्ट्राच्या दारात १४००० सैन्य उभे केले.
रावण आणि वाली यांच्यात असे ठरले की 'आपण एकमेकांचे अग्निसाक्ष मित्र झालो आहोत तेव्हा आपण एकमेकांवर कधीही आक्रमण करायचे नाही. उलट एकमेकांना मदत करायची.' इतकेच नाही तर रावणाने मुत्सद्दीपणे वानर राष्ट्राची उत्तर सीमा निश्चित केली आणि त्या सीमेच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःकडे ठेवली. पंचवटी या राज्याच्या सीमेशी रावणाने १४००० सैन्य ठेवले आणि खर, दूषण, त्रिशिरा हे मावसभाऊ असलेले पराक्रमी वीर यांच्याकडे त्याचे नेतृत्व दिले. आणि या तिघांवर लक्ष ठेवायला सख्खी बहिण शूर्पणखा हिची योजना केली. मानव आणि वानर राज्यांच्या सीमेवर रावणाने हेतुपूर्वक सैन्य उभे केले. कारण मानव आणि वानर राष्ट्रात मैत्री झाली तर रावणाला धोका उत्पन्न झाला असता!"
हृषी रामाला पुढे सांगतात की, "रामा, या तिघांनीही रावणाचा प्रभाव केला होता. रावण श्वेतद्वीपात गेला असताना तेथील स्त्रियांनी सुद्धा रावणाचा पराभव केला होता. पण त्याला मारण्यात तुझाच मोठेपणा का.. तर.. या सर्वांच्या बाबतीत झाले काय की, त्यांनी स्वतःचा वैयक्तिक पराक्रम सिद्ध केला. शक्तीचा उपयोग स्वतःपुरता केला. पूर्ण त्रिभुवनातील लोकांना रावण त्रास देत होता. त्या लोकांचा त्रास वाचवावा ही कल्पना सुद्धा त्यांच्या मनाला शिवली नाही. ते महान कार्य तू केलेस.सर्वांना निर्भयता मिळवून दिलीस. सर्वांना स्वातंत्र्य मिळवून देण्याकडे पराक्रमाचा उपयोग तू केलास यातच तुझा मोठेपणा आहे.."
व्यक्तीचा मोठेपणा हा त्याच्या पराक्रमावर नाही तर त्याच्या निर्णयावर असतो.
* ही गोष्ट मी 'वाल्मिकी रामायणावरील प्रवचने' या वं. लक्ष्मीबाई केळकर यांच्या पुस्तकात वाचली आहे.*
या तिघांनीही रावणाचा पराभव केलेला होता. पण घडले असे की, बली कडून रावण पराजित झाला तेव्हा रावणाचा पिता विश्रवामुनी अतिथी म्हणून बळीच्या दाराशी गेला आणि याचना करून भिक्षारुपाने रावणाची त्याने मुक्तता करून घेतली. सहस्त्रार्जुनाकडून सुद्धा तशीच मुक्तता करून घेतली. रावणाला जिंकणारा तिसरा वीरपुरुष वानर राजा वाली सोबत रावणाने वेगळी पावले टाकली.
त्यावेळी वानर राष्ट्र आणि राक्षस राष्ट्र ही दोन्ही बलाढ्य राष्ट्रे होती. पहिले रावणाने स्वतःच वालीवर आक्रमण केले. वालीने त्या आक्रमणात रावणाला हरविले. आपण हरलो हे लक्षात येताच रावणाने वालीसोबत अग्निसाक्ष 'सख्य' करून मैत्रीचे नाते जोडले. या मैत्रीच्या तहात रावणाने मोठ्या हुशारीने वानर राष्ट्राच्या दारात १४००० सैन्य उभे केले.
रावण आणि वाली यांच्यात असे ठरले की 'आपण एकमेकांचे अग्निसाक्ष मित्र झालो आहोत तेव्हा आपण एकमेकांवर कधीही आक्रमण करायचे नाही. उलट एकमेकांना मदत करायची.' इतकेच नाही तर रावणाने मुत्सद्दीपणे वानर राष्ट्राची उत्तर सीमा निश्चित केली आणि त्या सीमेच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःकडे ठेवली. पंचवटी या राज्याच्या सीमेशी रावणाने १४००० सैन्य ठेवले आणि खर, दूषण, त्रिशिरा हे मावसभाऊ असलेले पराक्रमी वीर यांच्याकडे त्याचे नेतृत्व दिले. आणि या तिघांवर लक्ष ठेवायला सख्खी बहिण शूर्पणखा हिची योजना केली. मानव आणि वानर राज्यांच्या सीमेवर रावणाने हेतुपूर्वक सैन्य उभे केले. कारण मानव आणि वानर राष्ट्रात मैत्री झाली तर रावणाला धोका उत्पन्न झाला असता!"
हृषी रामाला पुढे सांगतात की, "रामा, या तिघांनीही रावणाचा प्रभाव केला होता. रावण श्वेतद्वीपात गेला असताना तेथील स्त्रियांनी सुद्धा रावणाचा पराभव केला होता. पण त्याला मारण्यात तुझाच मोठेपणा का.. तर.. या सर्वांच्या बाबतीत झाले काय की, त्यांनी स्वतःचा वैयक्तिक पराक्रम सिद्ध केला. शक्तीचा उपयोग स्वतःपुरता केला. पूर्ण त्रिभुवनातील लोकांना रावण त्रास देत होता. त्या लोकांचा त्रास वाचवावा ही कल्पना सुद्धा त्यांच्या मनाला शिवली नाही. ते महान कार्य तू केलेस.सर्वांना निर्भयता मिळवून दिलीस. सर्वांना स्वातंत्र्य मिळवून देण्याकडे पराक्रमाचा उपयोग तू केलास यातच तुझा मोठेपणा आहे.."
व्यक्तीचा मोठेपणा हा त्याच्या पराक्रमावर नाही तर त्याच्या निर्णयावर असतो.
* ही गोष्ट मी 'वाल्मिकी रामायणावरील प्रवचने' या वं. लक्ष्मीबाई केळकर यांच्या पुस्तकात वाचली आहे.*
खुप छान...मला स्वत:ला सुद्धा या बद्दल माहिती नव्हती.
व्यक्तीचा मोठेपणा हा त्याच्या पराक्रमावर नाही तर त्याच्या निर्णयावर असतो. खरे आहे ते
thank u :)
Hi Madhura,
kharach khup chan malasuddha ya baddal mahiti nawat...ramayanatil eka navin babiwar prakash padalas
khup khup dhanyawad. :)
thank u Mandar :)
khup chan aahe goshtta...
Thank U Gauri.. :)
>> या सर्वांच्या बाबतीत झाले काय की, त्यांनी स्वतःचा वैयक्तिक पराक्रम सिद्ध केला. शक्तीचा उपयोग स्वतःपुरता केला. पूर्ण त्रिभुवनातील लोकांना रावण त्रास देत होता. त्या लोकांचा त्रास वाचवावा ही कल्पना सुद्धा त्यांच्या मनाला शिवली नाही. ते महान कार्य तू केलेस.सर्वांना निर्भयता मिळवून दिलीस. सर्वांना स्वातंत्र्य मिळवून देण्याकडे पराक्रमाचा उपयोग तू केलास यातच तुझा मोठेपणा आहे..
पण रामानेही आपल्या पत्नीची सुटका करण्यासाठीच रावणाशी युद्ध पुकारलं. त्यात लोकांचा त्रास वाचवावा. सर्वांना निर्भयता मिळवून द्यावी हा उदात्त हेतू कुठेच नव्हता.. नाही का?
बिलकुल होता!! जर लोकांना वाचवण्याचा विचार नसता तर रामानी सीतेला सोडवून बळीराजा, सहस्त्रार्जुन आणि वाली प्रमाणे रावणाला सोडून दिलं असतं.. आणि रामानी नेहमीच प्रजेचा विचार केला, त्यांना सुखी ठेवलं असंच आपण पाहिलंय.. जर प्रजेचा विचार केला नसता तर स्वतःच्या पत्नीचा प्रजेतल्या एका माणसाच्या बोलण्यावरून त्याग केला असता का??
>> जर प्रजेचा विचार केला नसता तर स्वतःच्या पत्नीचा प्रजेतल्या एका माणसाच्या बोलण्यावरून त्याग केला असता का??
पण ते योग्य होतं का?? जिची काही चूक नसताना ती रामाबरोबर वनवासाला गेली आणि अशा स्त्रीचा एका यःकिश्चीत धोब्याच्या आरोपावरून रामाने त्याग केला.. हे बरोबर वाटतं तुम्हाला?
मी नास्तिक नाही.. किंवा वाद घालायचाय असंही प्लीज समजू नका. जे वाटलं/पटलं ते लिहिलं.
नाही.. हे मला पण पटत नाही.. पण हे मत तुमच्या आमच्या सारख्या सामान्यांचं आहे.. पण राम सामान्य नव्हता. तो देवाचा अवतार होता.. आणि देवाचा अवतार हा आदर्श निर्माण करण्यासाठी असतो.. रामानी नेहमी राजाने कसं वागला पाहिजे याचा आदर्श दिला आहे. तर कृष्णानी अन्याय कधीही सहन करू नये ही शिकवण दिली.. रामाच्या उद्दिष्टासमोर त्यांनी स्वताचा स्वार्थ पहिला नाही.. एक-पत्नी निष्ठ असलेला राम, त्याचं त्याच्या पत्नीवर किती जास्त प्रेम असेल! पण तो एक आदर्श राजा होता. त्यामुळे त्या धोब्याला पण किंमत होतीच राजाच्या लेखी! आणि सीतेला रामाच्या वागण्याचा वाईट वाटलं पण राग नाही आला! म्हणून तर ते दोघंही महान होते.. म्हणून तर आपण युगा-नु-युगे त्यांची पूजा करतो!
माझं हे मत पटतं का? and don't be so formal. feel free to speak on this topic.
>> and don't be so formal. feel free to speak on this topic.
मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल आभार. अहो तसं नाही. पण अशा नाजूक विषयात मत मांडताना समोरचा कधीही दुखावला जाऊ शकतो म्हणून मी थोडं सावधपणे बोलत होतो. पण तुम्ही मोकळेपणी लिहा असं म्हटल्यानेच पुढचा प्रतिसाद देतोय..
कदाचित आदर्श राजा असेलही राम परंतु आदर्श पती, आदर्श पिता खचितच नव्हता नाही का? असो..
पुन्हा मूळ मुद्दा. जर रामाने जगाचं कल्याण करण्यासाठी रावणाचा वध केला असेल तर रावणाने सीतेचं अपहरण करण्याच्या फार पूर्वी त्याने तसं करायला हवं होतं. त्यामुळे रामाने लोककल्याणासाठी नाही तर स्वार्थापोटीच रावणाचा वध केला. त्यातून आपोआप लोकंकल्याण झालं (असेल) हा भाग निराळा.
सीतेला पळवून नेणं हे रावणाच्या वधाचं निमित्त असेल.. पण मुद्दा तोच आहे ना! रामानी इतर राजांप्रमाणे रावणाला सोडून दिलं नाही! त्यांनी जसा मुर्खासारखा रावणावर विश्वास ठेवला तसा रामानी ठेवला नाही! रावणानी सीतेसारख्या अनेक स्त्रिया पळवून आणल्या होत्या.. त्यांना सुद्धा मुक्त केले.. सगळ्या राक्षसांना मारलं यात रामाचा कोणता स्वार्थ होता? हा ना कि या सगळ्यातून लोकांचा त्रास वाचवा??
>> कदाचित आदर्श राजा असेलही राम परंतु आदर्श पती, आदर्श पिता खचितच नव्हता नाही का?
असं खरंच वाटतं तुम्हाला? मग राम जन्मभर एक-पत्नी निष्ठ का राहिला?